राज्याच्या विविध भागांत १२ भिकाऱ्यांचा डोक्यात दगड घालून हत्या केल्याची कबुली सीरियल किलर सतीश वैष्णव याने पोलिसांच्या चौकशीत दिली असल्याची माहिती उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी दिली. पुणे स्थानकावर भिकाऱ्यांनी ८०० रुपये लुबाडल्यानेच हे हत्यासत्र त्याने अवलंबल्याचे सांगितले असले तरी अत्यंत घुमा असणारा हा आरोपी पाच वष्रे घराबाहेर आहे.
सतीश वैष्णव हा सध्या मिरज पोलिसांच्या ताब्यात असून, मिरजेत तीन भिकाऱ्यांची हत्या केल्याचे सांगत असला तरी दोन प्रकरणे उघडकीस आली आहेत. तिसऱ्या प्रकरणी त्याने एका वृद्ध इसमाच्या डोक्यात दगड घालून पलायन केले. मात्र हा इसम रुग्णालयातील उपचारानंतर व्यवस्थित आहे. ही घटना रेल्वेस्थानकावर घडली. तीनही घटनांच्या जागा आणि घटनाक्रम सीरियल किलर वैष्णव याने सुसंगतपणे सांगितले आहेत.
बोलण्यास मात्र त्याचा नकार दिसून आला असून भावनिक आवाहनानेच त्याच्याकडून कबुली घेण्यात येत आहे. मात्र चार-चार महिने अंघोळीचा पत्ता नाही, भिकाऱ्यांजवळ असणारे कपडे तो वापरत होता. पोलिसांनी त्याला नवीन कपडे देऊन भावनिक आधार देत त्याच्याकडून गरकृत्यांची कबुली घेण्यात येत आहे. अद्याप उद्यापर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत त्याने हे प्रकार केले आहेत का? याचीही खातरजमा करण्यात येत असून राज्यातील मिरजेत ३, कोल्हापूर येथे २, पुणे येथे १, शिर्डी ३, पंढरपूर १, मनमाड १ आणि लातूर येथे १ असे १२ खून केल्याची कबुली सतीश वैष्णव याने दिली आहे. यापकी शिर्डी येथील एका महिलेचा वगळता अन्य ठिकाणी पुरुष भिकाऱ्यांचे खून केले असल्याचे वैष्णव सांगत असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.