पहेला येथील महात्मा मागासवर्गीय सहकारी संस्थेने, मत्स्यपालनाकरिता घेतलेल्या तलावाचे पाणी कोणालाही सूचना न देता उसरीपार येथील शेतकऱ्यांनी गव्हाच्या पिकाकरिता नाली फोडून लांबविल्यामुळे तलावातील लाखो रुपये किमतीच्या मासोळ्या मरून पडल्या.
 संस्थेने तलावात ३१ हजार ९०० रुपयांचे मत्स्यबीज सोडले होते. या घटनेची तक्रार संस्थेने सहायक आयुक्त (मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) यांच्याकडे नोंदविला आहे.