उरण तालुक्यातील चिरनेर येथील मुळडय़ात राहणाऱ्या शालिग्राम गजानन मुंबईकर (२८) या तरुणाची शनिवारी रात्री हत्या झाल्याची घटना घडली असून, उरण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मारेकऱ्याने हत्याराने डोक्यावर वार केल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला,   असे उरण पोलिसांनी म्हटले आहे. तसेच ही घटना दुपारी ३ ते ८ वाजताच्या दरम्यान ही हत्या झाली असून, फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.