आत्मक्लेश करायला अगोदर माणसाचा आत्मा साफ हवा, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांचा नामोल्लेख टाळून टीकास्त्र सोडले.
सोलापूरजवळील कुंभारी येथे स्वामीनारायण इंटरनॅशनल गुरुकुलचे उद्घाटन अण्णा हजारे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिकपणे संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. आत्मक्लेश करणाऱ्या माणसाचा आत्मा स्वच्छ व साफ असावा लागतो. आत्मा साफ नसेल तर आत्मक्लेश करून काय उपयोग, असा सवाल त्यांनी उपस्थित करीत अजित पवारांना टोला मारला. राज्यातील सध्याचा दुष्काळ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याचा अण्णांनी पुनरुच्चार केला.