उरण तालुक्यातील जसखार येथील रेल्वे क्रासिंग नसलेल्या रेल्वे फाटकावरून जाणाऱ्या सारडे गावातील महेश हरिश्चंद्र पाटील(२६) या तरुणाचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्र साडेआठ वाजताच्या सुमारास घडली आहे. जेएनपीटी बंदरातील कंटेनरची वाहतूक करण्यासाठी ये-जा करणाऱ्या रेल्वे मार्गावरील जसखार येथे ही घटना घडली आहे. येथील करळच्या रेल्वे उड्डाण पुलावर नेहमीच वाहतूक कोंडी असल्याने जसखार येथे रेल्वे फाटक नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरून मोटारसायकली तसेच तीनचाकी रिक्षा ये-जा करतात. अशा प्रकारे रेल्वे फाटक ओलांडत असताना या तरुणाचा समोरून येणाऱ्या रेल्वेची धडक लागल्याने मृत्यू झाला.