म्हाडा वसाहत होणार असल्याचे सांगून रहिवाशांना जागा सोडण्यासाठी दांडगाई करणाऱ्या नगरसेवकाविरुद्ध येथील रमाबाई नगरातील रहिवाशांनी महापालिका आयुक्त दौलतखाँ पठाण यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. रमाबाई नगर परिसराचे नगरसेवक जितेंद्र शिरसाठ हे नगरातील रहिवाशांना त्यांची घरे सोडायला सांगत आहेत. या भागात म्हाडाची वसाहत उभी राहणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत असून या भागात रोज बुलडोझर आणण्यात येतो. घरातील वस्तू फेकण्याची धमकी देण्यात येते. म्हाडाची वसाहत होणार असेल तर आम्हाला नोटीस का देण्यात आलेली नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.