शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ इंद्रचंद हिरालाल जैन (वय ८२) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातू, पणतू असा परिवार आहे. दयानंद शिक्षण संस्थेचे संयुक्त सचिव सुरेश जैन त्यांचे पुत्र होत. इंद्रचंद जैन प्रारंभी जालना येथे न्यायाधीश होते. त्यानंतर त्यांनी लातुरात वकिली सुरू केली. लातूर जिल्हा वकील मंडळाचे ते अध्यक्ष होते. विवेकानंद ट्रस्टचे संचालक, मारवाडी स्मशानभूमी समितीचे अध्यक्ष, राजस्थान व दयानंद शिक्षण संस्थेचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम केले. लातूर शहर संघचालक पदावर त्यांनी काही काळ काम केले होते.