गेल्या काही वर्षांत दिवाळीचा फराळ तयार करून विकणे हा एक मोठा व्यवसाय बनला आहे. घरी फराळ तयार करण्याची प्रथा आता दिवसेंदिवस संपत चालली असल्याने तयार फराळाची बाजारपेठ त्या प्रमाणात वाढू लागली आहे. यंदा तयार फराळाला मागील वर्षीच्या दुप्पट मागणी येईल, असा अंदाज या क्षेत्रातील उद्योजक व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर महागाईमुळे फराळाच्या किमतीत सुमारे २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर परदेशी पाठवण्याच्या फराळांच्या दरात तर सुमारे ६० ते ७० टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
दादरच्या ‘ब्राह्मण सेवा मंडळा’चे पदाधिकारी दिनेश गानू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान आमच्याकडे सुमारे पाच ते साडेपाच लाख किंमतीच्या फराळाची विक्री झाली होती. त्यामध्ये अर्थातच लाडू, चिवडा, चकली यांना जास्त मागणी होती.’ यंदाही त्यांनी याच दृष्टीने फराळ तयार करण्यास सुरवात केली आहे. दादरच्या ‘स्वागत फास्ट फूड’चे मयूर जावळे यांच्याकडे दिवाळीनिमित्ताने परदेशी फराळ पाठवण्याची सोय आहे. गेल्यावर्षी सुमारे १०० फराळाची पाकिटे त्यांनी परदेशी पाठवली होती. गेल्या वर्षी हा भाव १५०० रुपये होता. यंदा परदेशात फराळ पाठवण्याच्या पकिटांची किंमत २,५०० रुपयांपासून सुरू होत आहे. यंदा पाकिटांची संख्या १५० ते २०० पर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. या पाकिटामध्ये पाच-पाच लाडू, अनारसे, करंज्या, पाव किलो चकली, पाव किलो शंकरपाळ्या, १०० ग्राम कडबोळ्या आदींचा समावेश असतो.
बेक फराळाला मोठी मागणी
गेल्या काही वर्षांपासून ‘बेक फराळा’ची मागणी जोर धरू लागली आहे. अर्थात अजूनही पारंपरिक फराळाच्या तुलनेत त्याचे प्रमाण कमीच आहे, असे जावळे यांनी सांगितले. ‘बेक फराळ बनवणे नेहमीचा फराळ बनवण्यापेक्षा जिकिरीचे असते. आहाराबाबत अधिक जागरुकता येत चालल्याने बेक फराळाला मागणी वाढू लागली आहे. या फराळात पदार्थ तेलातुपात तळण्याऐवजी भाजले जातात. त्यामुळे कॅलरी वाढत नाहीत. अन्य दुष्परिणामही कमी होतात. त्यामुळे हळूहळू बेक फराळ घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. अर्थात पारंपरिक फराळाची सवय झालेली मंडळी बेक फराळाबरोबरच पारपंरिक फराळही घेतात.

फराळाच्या पदार्थाच्या किंमती
* मोतीचूर लाडू      शेकडा  १५०० रुपये
* बेसन लाडू         शेकडा  १२०० रुपये
* करंजी                  १५ ते १८ रुपये
* बेक करंजी         २० रुपये(प्रतिनग)
* शंकरपाळे          २२० ते २४० रुपये किलो
* चकली              ३०० रुपये किलो
* चिवडा                  २४० रुपये किलो
* कडबोळी            २०० ते ३०० रुपये किलो
* चिरोटे                ३२० ते ५०० रुपये किलो
*  अनारसे              १४ ते १५ रुपये (प्रतिनग)  

Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद