तब्बल सात दशकांहून अधिक काळ लिहित्या असलेल्या ज्येष्ठ हिंदी कादंबरीकार व ललित लेखिका कृष्णा सोबती यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार  जाहीर झाला आहे. १९४४ साली पहिली कथा लिहिणाऱ्या सोबती यांना २०१७ साली ज्ञानपीठ मिळेपर्यंत काळाचा मोठा पल्ला ओलांडला गेला आहे. काळाच्या या गतिचक्राचे भान सोबती यांच्या या वर्षीच प्रकाशित झालेल्या ‘गुजरात पाकिस्तान से गुजरात हिंदुस्थान तक’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीत सर्वार्थाने व्यक्त झाले आहे. हे भान जपल्यामुळेच वास्तवापासून त्या कधी अलिप्त राहिल्या नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरात जिल्ह्य़ातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात १८ फेब्रुवारी १९२५ रोजी सोबती यांचा जन्म झाला. सुरुवातीचे शिक्षण दिल्ली व शिमला इथे झाले. पुढे लाहोर येथे उच्चशिक्षण घेत असतानाच भारताची फाळणी झाली आणि त्यांचे कुटुंब निर्वासित म्हणून दिल्लीत परतले. आधी राजस्थानच्या सिरोही संस्थानात काही काळ नोकरी केलेल्या सोबती यांनी लवकरच पूर्ण वेळ लेखनाला वाहून घेतले.  ‘लामा’, ‘नफिसा’, ‘सिक्का बदल गया’ या १९४४ साली प्रकाशित झालेल्या कथा असोत किंवा १९५९ मध्ये ‘दो राहें दो बाहें’ ही नंतर कादंबरीरूपात प्रकाशित झालेली कथा, अथवा ‘बादलोंके घेरे’ (१९८०), ‘यारों के यार तीन पहाड’ (१९८९) हे कथासंग्रह असोत, त्यातून त्यांच्या भाषेची निराळी शैली त्यांनी हिंदीमध्ये आणली. सरळसाधेपण व प्रवाहीपण ही त्या भाषेची वैशिष्टय़े आहेत. निर्वासित असण्याचा स्वानुभव आणि त्याच्यासोबतचे जगणे यांचा पट मांडतानाही त्यांची भाषा संयमित राहिली.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krishna sobti jnanpith award hindi literature
First published on: 04-11-2017 at 01:40 IST