(Photo: Social Media)
May 05, 2025
(Photo: Social Media)
(Photo: Social Media)
बिहारमधील खेलो इंडिया युथ गेम्सच्याउद्घाटनादरम्यान पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात वैभवच्या वादळी शतकी खेळीवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
(Photo: Social Media)
पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी आयपीएलमध्ये बिहारचा मुलगा वैभव सूर्यवंशीचा शानदार कामगिरी पाहिली आहे. इतक्या कमी वयात त्याने इतका मोठा विक्रम केला आहे. यामागे त्याचे कठोर परिश्रम आहेत."
(Photo: Social Media)
ते पुढे म्हणाले, "सूर्यवंशीचे हे यश मुख्यत्वे त्याने धेय्य डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कठोर सरावामुळे आणि मोठ्या आव्हानाची तयारी करण्यासाठी अनेक सामने खेळल्यामुळे त्याला प्राप्त झाले आहे"
(Photo: Social Media)
पतप्रधान म्हणाले, 'वैभवने वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक सामने खेळून त्याची प्रतिभा वाढवली. तुम्ही जितके जास्त खेळाल तितके तुम्ही खेळात सुधारतात. त्यासाठी विविध सामने आणि स्पर्धांमध्ये भाग घेणे खूप महत्वाचे आहे.
(Photo: Social Media)
दरम्यान, वैभवने गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक झळकावले होते. तो एका रात्रीत प्रसिद्ध झाला. वैभवच्या फलंदाजीचे सर्वजण कौतुक करत आहेत.
(Photo: Social Media)
विशेष म्हणजे आयपीएलमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूने सर्वात कमी चेंडूत झळकावलेले हे पहिले शतक आहे.
(Photo: Social Media)
वैभव त्याचा खेळ सुधारण्यासाठी, दररोज ४०० ते ४५० शॉट्स खेळत असे.
(Photo: Social Media)
मार्च २०११ मध्ये जन्मलेला वैभव हा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर येथील रहिवासी आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video : नको करू सखी असा साजिरा श्रृंगार…