(Photo: Canva)
Jun 19, 2025
(Photo: Pexels)
पावसाळ्यात काही विशिष्ट पदार्थ खाणे टाळणे आरोग्यासाठी चांगले असते. यामध्ये तळलेले पदार्थ, जसे की भजी, वडा, समोसे, तसेच रस्त्यावरील (स्ट्रीट फूड) पदार्थ, जसे की पाणीपुरी, भेळ, आणि मसालेदार पदार्थ टाळणे फायद्याचे ठरते.
(Photo: Canva)
पावसाळ्यात आधीच कापून ठेवलेली फळं खाऊ नका, कारण दमट हवामानामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात. त्यामुळे फळं लगेच कापून खा.
(Photo: Canva)
कोबी, पालक, शेपू अशा भाज्यांची पाने पावसाळ्यात कीटक आणि अस्वच्छ पाण्यामुळे सहज खराब होतात.
(Photo: Pexels)
दमट हवामानात कोवळ्या मोड आलेल्या भाज्या खाणे टाळा, कारण त्यामध्ये बॅक्टेरिया आकर्षित होतात.
(Photo: Unsplash)
पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे म्हणजे आजारपणाला आमंत्रण. यावेळी संयम बाळगा आणि अस्वच्छ ठिकाणी खाणे टाळा.
(Photo: Unsplash)
थंड ड्रिंक्स पचनक्रिया कमकुवत करु शकतात, या ऐवजी तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता.
(Photo: Canva)
पावसाळ्यात मासे, कोळंबी खाणे टाळा, कारण हा त्यांचा प्रजननाचा काळ असतो. तुम्ही मटण, चिकन खाऊ शकता.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
भारतातल्या सर्वात उंच ७ इमारती, सगळ्या मुंबईत!