भारताकडे वेगवान गोलंदाजांची परंपरा कधीच नव्हती. पण सध्याचा विश्वचषकातील भारताचा वेगवान मारा आतापर्यंतचा सर्वाधिक जलद ठरला आहे. त्यामुळेच भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकण्याची सर्वाधिक संधी असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले आहे.
‘‘भारतीय वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. जेव्हा ते लयीत असतात तेव्हा त्यांचाच दिवस असतो. मोहम्मद शमीची गोलंदाजी ही प्रभावित करणारी आहे. या वेगवान गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर भारताला जिंकण्याची अधिक संधी असेल,’’ असे ली म्हणाला.