भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारताची तुलना इस्रायलशी केली आणि राहुल गांधींचे कौतुक केले. आफ्रिदीने भारत सरकारवर टीका करताना राहुल गांधी सकारात्मक विचारांचे असल्याचे म्हटले. आफ्रिदीच्या विधानांमुळे वाद निर्माण झाला असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.