कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवबंधन तोडत आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. साळवी यांनी बुधवारी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात त्यांचा मोठा प्रभाव आहे. विनायक राऊत यांच्याशी वादामुळे साळवी उद्धव ठाकरेंपासून दूर गेले. आता एकनाथ शिंदे त्यांना मोठी जबाबदारी देतील अशी शक्यता आहे.