इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजविरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील सलग दोन सामने जिंकत इंग्लंडने वेस्ट इंडिजविरूद्धची मालिका २-० ने जिंकली. दुसऱ्या सामन्यात १६६ धावा करत जो रूट सामन्याचा हिरो ठरला. तर दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स आणि आरसीबी संघातील खेळाडूंनी मोठं योगदान दिलं आहे.
दुसरा वनडे सामना कार्डिफमध्ये खेळवला जात होता. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यासह प्रथम फलंदाजीला उतरलेला वेस्ट इंडिजाचा संघ ४८व्या षटकात ३०८ धावा करत सर्वबाद झाला. ब्रँडन किंगने चांगली सुरूवात केली. तर दुसरा सलामीवीर खाते न उघडताच बाद झाला. किंगने अर्धशतकी खेळी केली. यानंतर तुफान फॉर्मात असलेल्या केसी कार्टीने अजून शतक झळकावलं. कार्टीने १०५ चेंडूत १३ चौकारांसह १०३ धावा केल्या.
यानंतर कर्णधार शे होपने ७८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. यानंतर कोणताच फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. परिणामी वेस्ट इंडिजचा संघ सर्वबाद झाला. इंग्लंडकडून साकिब महमूदने ३ विकेट्स आदिल रशीदने ४ विकेट्स, तर ब्रायडन कार्स, जेकब बेथल आणि विल जॅक्सने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
वेस्ट इंडिजने दिलेल्या ३०९ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडची सुरूवात खूपच वाईट झाली. जॅमी स्मिथ आणि बेन डकेट शून्यावर बाद झाले. यानंतर आलेल्या जो रूटने पहिल्या दोन विकेटची कसर भरून काढली. जो रूटने १३९ चेंडूत २१ चौकार आणि २ षटकारांसह १६६ धावांची नाबाद खेळी केली. यासह तो वनडेमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक ७ हजार धावा करणारा खेळाडू ठरला.
रूटशिवाय कर्णधार हॅरी ब्रुकने ४७ धावांची जेकब बेथल १७ धावा तर विल जॅक्स ४९ धावा करत बाद झाले. जो रूट शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने चौकारासह संघाला विजय मिळवून दिला.
तर पहिल्या डावात फलंदाजी करत ४०० धावा केल्या होत्या. या सामन्यात इंग्लंडच्या सर्व फलंदाजांनी ३० च्या वर धावा करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले होते. तर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला १६२ धावांवर सर्वबाद करत तब्बल २३८ धावांनी सामना जिंकला. या सामन्यातही साकिबने ३ विकेट्स आणि जेमी ओव्हरटनने ३ विकेट्स घेतले होते.https://x.com/englandcricket/status/1928179542453096944
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील विल जॅक्सने पहिल्या सामन्यात २४ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ३९ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या सामन्यात विल जॅक्सने २८ चेंडूत २ चौकारांसह ४९ धावांची खेळी केली तर गोलंदाजीत एक विकेटही घेतली. तर आरसीबीचा फलंदाज जेकब बेथल पहिल्या सामन्याचा सामनावीर खेळाडू ठरला. त्याने पहिल्या सामन्यात ५३ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या सामन्यात १७ धावा केल्या.