आजकाल नोकरी बदलणं सामान्य झालं आहे. पुण्यातील एका कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने २५ लाख वार्षिक पगारासाठी बंगळुरु गाठलं, पण तो आता पस्तावला आहे. त्याने मित्राला सांगितलं की, पुण्यात कमी पगारातही सुखात होतो. बंगळुरुतील महागाई, वाहतूक कोंडी आणि उच्च भाडे यामुळे त्रस्त आहे. त्याचा अनुभव मित्राने LinkedIn वर शेअर केला, ज्यामुळे चर्चा रंगली आहे.