बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवत मोठी आघाडी घेतली आहे, तर काँग्रेस-आरजेडी आघाडीचा सपशेल पराभव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत बिहारच्या विजयाचा उत्सव साजरा केला. तसेच पुढचा क्रमांक आता पश्चिम बंगालचा असेल, असे सूचक विधान पंतप्रधान मोदी यांनी केले.