नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. सात दिवसांपूर्वीच त्यांचं हिमांशीसोबत लग्न झालं होतं. मधुचंद्रासाठी काश्मीरला गेलेल्या विनय यांना दहशतवाद्यांनी ठार केलं. त्यांच्या पार्थिवाला अखेरचं नमन करताना हिमांशीच्या अश्रूंचा बांध फुटला. विनयच्या मृत्यूमुळे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे.