नाशिक व अहमदनगरमधील धरणांच्या जलसाठय़ाचा र्सवकष आढावा घेऊन जायकवाडीपर्यंत किती पाणी देता येऊ शकेल, याचा अहवाल पुढील चोवीस तासात राज्य शासनास सादर केला जाणार आहे. तसेच औरंगाबादला पाणी देताना नाशिक व नगर जिल्ह्यांसाठी आरक्षित असणारे पाणी दिले जाणार नसल्याचे विभागीय महसूल आयुक्त रवींद्र जाधव यांनी स्पष्ट केले. यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दोन्ही जिल्ह्यांतील धरणांमध्ये जे पाणी आधीच आरक्षित आहे, त्यातील पाणी जायकवाडीला दिले जाणार नाही. यामुळे नागरिकांनी आपल्यावर जलसंकट कोसळणार अशी भीती बाळगू नये, असा दिलासा जाधव यांनी दिला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-04-2013 at 02:28 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reserve water of nasik and nagar district setuation as it is