अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून १७५० क्युसेक वेगाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात आले आहे. तसेच ज्यामार्गाने जायकवाडी धरणात पाणी येणार आहे या दरम्यानच्या गावांतील वीजपुरवठा खंडीत करुन पाणीचोरी रोखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी याचीका सोमनाथ रोडे यांनी खंडपीठात दाखल केली होती. यावर गेल्या बुधवारी न्यायालयाने पाणी सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. दरम्यान, राज्य शासनाने पुनर्विलोकन याचिका दाखल केली. खंडपीठाने याचिका फेटाळून लावली आणि हस्तक्षेप अर्जावर सोमवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले.
नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली होती. त्यानंतर आज(रविवार) सकाळी निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणात पाणी येण्यास ४८ तास लागण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2013 रोजी प्रकाशित
अखेर जायकवाडीला पाणी मिळाले; निळवंडे धरणातून १७५० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणातून १७५० क्युसेक वेगाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात
First published on: 28-04-2013 at 02:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water release to jayakwadi dam from nilwande dam