काय गंमत बघा, उन्हाळ्यात जे खाऊ नये तेच मी खाते, तो म्हणजे आंबा. तो प्रचंड हीट देतो, पण मला तो खाल्ल्याशिवाय राहवत नाही, याचे काय ते दुष्परिणाम होतातच. माझ्यावरही ते झाले असून थोडासा डोळ्याला प्रॉब्लेम झाला आहे. भरपूर दही-ताक खाऊन या उष्णतेपासून मी बचाव करते.
मानसी सिंग
दीपाली सय्यद
उष्णतेचे हे दिवस म्हटले की, एकदा कोल्हापूरमध्ये माझे झालेले हाल आठवतात. भरत जाधव व इतरांसोबत एका मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांच्या ताटातला पांढरा रस्सा, मटण-चिकन वगैरे पाहून मलाही वाटले, चार दिवस आपणही चमचमीत खावे, ..नंतर मात्र महिनाभर मी दहीभातावर होते. तेव्हापासून ठरवले, मार्च महिना सुरू झाल्यावर जेवणात बदल करायचा. शूटिंगला जाताना घरून खिचडीचा डबा घेऊन जाते. पण मुंबईबाहेर दूरवर शूटिंग अथवा नृत्याचे कार्यक्रम असले की, ‘आपण काय खातोय’ यावर कटाक्षाने लक्ष ठेवावे लागतेच. कलाकार म्हटलं की, ‘भटकंती’ ही आलीच, मग ऊन असो वा थंडी-पाऊस. पण खाणे व्यवस्थित असेल तर सर्व ‘झक्कास’ रुळते.
अतुला दुगल
उन्हाळ्यात आंबा खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात म्हणून तो टाळते. चहा-कॉफी-शीतपेय व जंक फूड शक्यतो दूरच ठेवते. कलिंगड, जाम व पांढरा कांदा यांना जास्त पसंती देते, डब्यात ते घेऊनच शूटिंगला निघते. गाजर, टोमॅटो, काकडी यावर ताव मारते. गुलकंद-चंदन असव-तुळशीचे बी या दिवसात खूप हितकारक. सकाळच्या कोवळ्या उन्हात काही काळ वावरते, ते ताजेपण देते, शूटिंगला निघताना चेहऱ्याला गुलाबपाणी लावते, ताजे ताक व माठातले पाणी खूप पिते. भडक रंगाचे कपडेही टाळते. उष्णतेपासून चारही बाजूने आपण बचाव करणे गरजेचे आहेच.
मनीषा केळकर
डॅडी (शक्ती कपूर) व मावशी (पद्मिनी कोल्हापुरे) अभिनयाच्या क्षेत्रात बरीच वर्षे असल्याने खाण्या-पिण्याच्या पथ्याचे भान मला केव्हाच आले आहे. तबियत सलामत तो करिअर सेफ हा मंत्र मी खूप लवकर अवलंबिला. उन्हाळ्यात तो अधिक काळजीने पाळते. नारळपाणी, कलिंगड यावर माझा जास्त भर असतो, या दिवसात पोट भरलेले असावे, पण ते हलकेही वाटावे.
चित्रांगदा सिंग
प्रार्थना बेहेरे