नवी दिल्ली : डिजिटल तंत्रज्ञानामुळे देशातील नागरिकांना हानी पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) नियमन केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील जागतिक कंपनी ‘ओपन एआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सॅम अल्टमन भारत दौऱ्यावर आले असताना केंद्र सरकारच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियमनासंदर्भात मांडली गेलेली जाहीर भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. अल्टमन यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
First published on: 10-06-2023 at 05:11 IST