गुजरातमध्ये २०२२ मध्ये झालेल्या मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणातील मुख्य आरोपी ओरेवा ग्रुपचे सीएमडी जयसुख पटेल यांना जामीन मिळाला आहे. परंतु, या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. तसंच, त्यांना इतर सात कडक बंधनेही लादण्यात आली आहेत.

या खटल्यातील मुख्य आरोपी जयसुख पटेल यांची सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन याचिका फेटाळल्यानंतर काही दिवसांनी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी.सी. जोशी यांच्या आदेशानुसार मोरबी उपजेलमधून सुटका करण्यात आली. जामीन देताना ट्रायल कोर्टाने त्याच्यासाठी कठोर अटी व शर्ती ठेवण्याचे निर्देश दिले. गुजरातमधील मोरबी शहरात नदीवर बांधलेला मोरबी सस्पेंशन ब्रिज ३० ऑक्टोबर २०२२ रोजी कोसळला होता. या दुर्घटनेत १३५ लोकांचा मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morbi bridge collapse oreva group cmd jaysukh patel released on bail barred from entering district agency sgk
First published on: 27-03-2024 at 11:42 IST