ओडिशातील जगन्नाथ पुरीचे पंडीत काशिनाथ मिश्रा यांनी मोठं विधान केलं आहे. सध्या भगवान कल्कींच्या धर्म स्थापनेचा काळ सुरू आहे. तसेच आगामी २०२४ च्या निवडणुकीत भारताचा शेवटचा पंतप्रधान होईल, असा दावा काशिनाथ मिश्रा यांनी केला. भविष्य पुराणाचा संदर्भ देत त्यांनी हा दावा केला. तसेच त्या पुराणात भारताच्या सर्व पंतप्रधानांविषयीही माहिती असल्याचं मिश्रा यांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काशिनाथ मिश्रा म्हणाले, “भविष्य पुराणात भारताच्या सर्व पंतप्रधानांविषयी लिहिलं आहे. तसेच उडिशाच्या सर्व मुख्यमंत्र्यांविषयी लिहिलं आहे. भविष्य पुराणात लिहिलं आहे की, भगवान कल्कीची धर्म स्थापना होईल तेव्हा योग करणारा किंवा नावात योगी असणारा भारताचा शेवटचा पंतप्रधान होईल. सध्या तो काळ (२०२४) सुरू आहे.”

हेही वाचा : जिंकणार भाजपच, पण शक्तिपात होतोय तो भाजपचाच… 

“भगवान कल्कींच्या काळात महायुद्ध होईल”

“भगवान कल्कींच्या शासनाच्या काळात महायुद्ध होईल, असंही भविष्य पुराणात लिहिलं आहे,” असंही काशिनाथ मिश्रा यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha jagannath puri pandit kashinath mishra big claim about last pm of india pbs