पीटीआय, बीजिंग

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात होत असलेली या वर्षीची जी-२० शिखर परिषद यशस्वी व्हावी यासाठी सर्व पक्षांबरोबर काम करायला तयार असल्याचे चीनने मंगळवारी स्पष्ट केले. भारताने या परिषदेचे यजमानपद भूषवण्यास आपण पाठिंबा दिला होता, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

नवी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबरला शिखर परिषदेसाठी सर्व देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी आपापली उपस्थिती कळवली आहे. मात्र, चीनचे खरे सत्ताधारी असलेले अध्यक्ष क्षी जिनिपग या परिषदेला उपस्थित राहणार नसून कमी अधिकार असलेले पंतप्रधान ली कियांग परिषदेसाठी येणार आहेत. जी-२० समूहाला चीनने नेहमीच महत्त्व दिले आहे.आणि त्याच्याशी संबंधित उपक्रमांमध्येही सहभाग घेतला आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

हेही वाचा >>>India to Bharat : भारत नावासंदर्भात मोदी सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात प्रस्ताव आणणार? केंद्रीय मंत्री म्हणतात…

’भारत आणि चीनदरम्यान असलेल्या सीमावादाचा उल्लेख न करता प्रवक्त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांचे संबंध एकंदरीत स्थिर आहेत आणि विविध स्तरांवर चर्चा व संवाद सुरू आहेत. भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये सातत्याने सुधारणा होत राहिल्यास दोन्ही देश आणि दोन्ही देशातील लोकांच्या हिताचे आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ready to work together for the success of the g 20 china explanation amy