मध्य प्रदेशमधील इंदूर हे सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर शहराने प्रथम क्रमांक कायम राखला, तर सुरत आणि नवी मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच महाराष्ट्र देशातील तिसरे स्वच्छ राज्य ठरले. ‘स्वच्छ भारत मिशन (नागरी)’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’चा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार, ‘स्वच्छतेबाबतची उत्तम कामगिरी’ या श्रेणीत आपले पहिले स्थान मध्य प्रदेशने कायम राखले. तर छत्तीसगड आणि महाराष्ट्र अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची स्वच्छ राज्ये ठरली. दुसरीकडे शंभरहून कमी स्वराज्य संस्था असलेल्या राज्यांच्या श्रेणीत त्रिपुरा अव्वल ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१६ मध्ये स्वच्छता सर्वेक्षणात २५ व्या क्रमांकावर येण्यापासून ते सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरण्यापर्यंतच्या इंदूरमधील बदलांची कहाणी उल्लेखनीय आहे. इंदूर हे भारतातील पहिले सप्ततारांकित कचरामुक्त शहरही आहे, जे स्वच्छ भारत मिशनच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे. इंदूर शहर कचर्‍याचे व्यवस्थापन नेमके कसे करते आणि या प्रक्रियेत महसूल कसा मिळवतो हे पाहूयात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what exactly is the cleanliness model of indore msr
First published on: 03-10-2022 at 11:58 IST