जागतिक पातळीवर मलेरिया रुग्णांची संख्या वाढती असली तरी भारतात मात्र मलेरियाचे रुग्ण आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांची संख्या घटताना दिसत आहे. भारताने मलेरियाला कसं काबूत आणलं आहे? हवामान बदलाचा मलेरियाला आटोक्यात आणण्यात किती वाटा आहे? मलेरियाला कह्यात ठेवण्यासाठी आणखी उपाययोजनांची आवश्यकता आहे का? मलेरियासंदर्भात भारतापुढची आव्हानं काय आहेत?

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालेल्या जागतिक मलेरिया अहवालात भारतासाठी चांगली बातमी आहे. डासांच्या माध्यमातून होणाऱ्या मलेरियामुळे भारतात होणाऱ्या संसर्गाचं आणि मृत्यूचं प्रमाण कमी होत आहे. भारतात मलेरियाचे ३३.८ लाख रुग्ण असल्याचं हा अहवाल सांगतो. मलेरियामुळे भारतात ५५११ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. मात्र हे आकडे भारतात मलेरिया संसर्गाच्या प्रमाणात ३० टक्क्यांनी घट झाल्याचं निदर्शक आहे. मलेरिया मृत्यूचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्यांनी खाली आलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World health organization report about malaria talks about india status psp