भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये आपलं अनोखं अर्धशतक साजरं केलं आहे. मात्र हे अर्धशतक फलंदाज म्हणून नसून कर्णधार या नात्याने झळकावलं आहे. विशाखापट्टणम कसोटीत विराट कोहलीच्या भारतीय संघाने आफ्रिकेवर २०३ धावांनी मात केली. पुण्यात खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट नाणेफेकीसाठी मैदानात उतरला, नाणेफेक जिंकत विराटने या कसोटी सामन्यातही फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार या नात्याने विराट कोहलीचा हा ५० वा कसोटी सामना ठरला आहे. या यादीत विराटने माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्व करणारे कर्णधार –

  • महेंद्रसिंह धोनी – ६०
  • विराट कोहली – ५०*
  • सौरव गांगुली – ४९
  • सुनिल गावसकर/मोहम्मद अझरुद्दीन – ४७
  • मन्सूर अली खान पतौडी – ४०

यावेळी नाणेफेकीदरम्यान विराट कोहलीने आपल्याला भारतीय संघाचं नेतृत्व करायला मिळाल्याबद्दल बीसीसीआय आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय संघाचं ५० कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करणारा विराट हा दुसरा कर्णधार ठरला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 2nd test virat kohli move past sourav ganguly and join ms dhoni in elite list in pune test psd
First published on: 10-10-2019 at 09:34 IST