रोहित शर्माची नुकतीच भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संघाचा माजी कर्णधार असलेल्या विराट कोहलीला आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळत नव्हते, त्यानंतर कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याने पायउतार होण्याचा निर्णय घेतला. दिग्गज क्रीडापंडित अनेकदा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील चांगल्या कर्णधाराची निवड करतात. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही आपले मत मांडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट आणि रोहितच्या कर्णधारपदावर गौतम गंभीरने मोठे वक्तव्य केले आहे. टाइम्स नाऊशी बोलताना गंभीर म्हणाला, ”रोहित शर्माने नुकतीच टी-२० कर्णधारपदाची सुरुवात केली आहे, त्यामुळे तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. रोहितने आयपीएलमध्ये ५ विजेतेपदे जिंकली आहेत, त्यामुळे त्याने काहीतरी चांगले केले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये तुम्हाला काही वेळा एक पाऊल पुढे असायला हवे. तुम्ही सामना हाताबाहेर जाऊ देऊ शकत नाही. रोहित कधीही सामना आपल्या हातातून निसटू देत नाही. त्याच्या खेळात आक्रमकता दिसून येते.”

हेही वाचा – ३० जुलै २०२०..! क्रिकेटर हार्दिक पंड्यानं हातावर काढला ‘नवा’ Tattoo; या तारखेमागचं रहस्य ऐकाल तर…

रोहितने विराट कोहलीपेक्षा जास्त यश मिळवले आहे, त्यामुळे रोहित थोडा चांगला कर्णधार होऊ शकतो, असे गंभीरचे मत आहे. रोहितचे कौतुक करताना गंभीर पुढे म्हणाला, ”जेव्हा तुम्ही या स्तरावर क्रिकेट खेळता, तेव्हा अधिक असुरक्षितता असते. तुम्ही जितकी जास्त काळजी घ्याल, तितकी तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल. मला खात्री आहे की ज्याप्रकारे रोहित शर्माला खूप पाठिंबा मिळाला आहे, तो तरुण खेळाडूंनाही तेवढाच पाठिंबा देईल.”

टी-२० विश्वचषक संपल्यानंतर भारताच्या रोहितला भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद मिळाले आहे. रोहितने काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत आपले कौशल्य दाखवले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली या संघाने ३ सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली. कायमस्वरूपी प्रशिक्षक झाल्यानंतर राहुल द्रविडची ही पहिलीच मालिका होती. यासह, आता रोहित आणि द्रविडकडून अशी अपेक्षा आहे, की हे दोघेही २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारताला विजय मिळवून देतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir tells who is the best captain among virat kohli and rohit sharma adn