भारतातील महान विद्वान आणि विद्वानांपैकी एक आचार्य चाणक्य हे त्यांच्या नीतिशास्त्रासाठी ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांच्या धोरणांच्या जोरावरच चंद्रगुप्त मौर्य हा मगधचा सम्राट होऊ शकला. आचार्य चाणक्य यांनी आयुष्यातील अनेक पैलूंवर आधारित वेगवेगळे धोरण तयार केले आहेत. यात त्यांनी समाजातील जवळपास सर्वच विषयांवर सूचना दिल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात धन, संपत्ती, पत्नी आणि मैत्री यासह सर्व विषयांवर सखोल चर्चा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आचार्य चाणक्यजींनी त्यांच्या नीतिशास्त्रात स्त्रियांबद्दल तपशीलवार वर्णन केलंय. आचार्य चाणक्यजींनी काही गुण सांगितले आहेत, जर एखाद्या व्यक्तीने असे गुण असलेल्या स्त्रीसोबत लग्न केलं तर त्याचे जीवन यशस्वी होते.

संतोषी स्त्री: आचार्य चाणक्यजी मानतात की, जी स्त्री समाधानी असते, ती लग्नानंतर पतीचे नशीब बदलते. अशी स्त्री आपल्या पतीला प्रत्येक परिस्थितीत साथ देते.

धैर्यवान स्त्री: एक धीर धरणारी स्त्री घराला स्वर्ग बनवते. आचार्य चाणक्यजी मानतात की जी स्त्री संयम बाळगते, ती आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. धैर्यवान महिला व्यक्तीचं नशीब बदलते. म्हणूनच आचार्य चाणक्यजी मानतात की, जीवनात संयम बाळगणे खूप महत्वाचे आहे.

राग न येणारी स्त्री : राग हा मनुष्याच्या विवेकाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. जी महिला अजिबात रागवत नाही अशा स्त्रीशी लग्न करणारा व्यक्ती खूप भाग्यवान असतो. चाणक्य जी मानतात की ज्या घरात कोणी रागावत नाही त्या घरात देव वास करतो. अशा घरांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होत नाही.

गोड बोलणारी स्त्री : चाणक्य जी मानतात की जी व्यक्ती गोड बोलते त्याच्या घरी लक्ष्मीचा वास असतो. म्हणून नेहमी गोड बोलले पाहिजे. आचार्य चाणक्यजी मानतात की ज्या व्यक्तीचा आवाज गोड आहे, अशा स्त्रीशी लग्न करणाऱ्या व्यक्तीचं नशीब बदलतं. अशी स्त्री घरातील वातावरण नेहमी प्रसन्न ठेवते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti says these type of women changes the fate of her husband after marriage prp