सतीश कामत, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाणीवपूर्वक राबवण्यात आलेल्या अभिनव शैक्षणिक उपक्रमांचा पटवाढीसाठी फायदा झाला असून गेल्या दोन वर्षांत या शाळांमध्ये एकूण सुमारे चौदाशे विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.  जिल्हा परिषद शाळांचा पट दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र मागील काही वर्षे राज्यातील अनेक ठिकाणी दिसत आहे. शैक्षणिक दर्जा, पायाभूत सुविधांसह इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थी आणि पालकांचा कल वाढू लागल्यामुळे या शाळांचा पट सतत घसरत राहिला. त्यावर मात करण्यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांबरोबरच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students increase in zilla parishad schools due to innovative initiatives zws
First published on: 16-08-2022 at 01:10 IST