जिल्ह्य़ातील आष्टीसह ९ तालुक्यांत पावसाळा सुरू होऊन महिना लोटला, तरी आजही ४५८ गावांना २०९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ३६५ गावांमध्ये १४० विहिरींचे, तर ३१५ बोअरचे अधिग्रहण केल्यामुळे पावसाळय़ातही पिण्याच्या पाण्यावर पाण्यासारखाच पसा खर्च करावा लागत आहे.
पावसाळा सुरू होऊन सव्वामहिना लोटला. मात्र, जिल्हय़ात चांगला पाऊस बरसलाच नव्हता. पंढरपूरची वारी फिरण्याच्या पूर्वसंध्येला पावसाचे आगमन होऊन दोन दिवसांत सर्वत्र चांगला पाऊस झाला. पाऊस सुरू झाला असला, तरी तलावातील पाणीसाठा व पाणीपातळी वाढण्यास आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या १७६ गावे व २८२ वाडय़ांची तहान टँकरच्या पाण्यावरच भागवावी लागत आहे. टँकरच्या प्रत्येक दिवसाला तब्बल ५३० खेपा होत असून, सर्वाधिक ९७ टँकर आष्टी तालुक्यात, तर बीड तालुक्यात ४५ टँकर सुरू आहेत. माजलगाव, वडवणी व अंबाजोगाई तालुक्यांत टँकर नाही.
इतर ९ तालुक्यांत मात्र टंचाईग्रस्त गावांसाठी टँकर सुरू केले आहेत. जिल्हय़ातील ३६५ गावांमध्ये १४० विहिरींचे, तर ३१५ बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पाऊस सुरू झाला असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी मात्र नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jul 2014 रोजी प्रकाशित
बीडमधील ४५८ गावांना २०९ टँकरने पाणीपुरवठा
जिल्ह्य़ातील आष्टीसह ९ तालुक्यांत पावसाळा सुरू होऊन महिना लोटला, तरी आजही ४५८ गावांना २०९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ३६५ गावांमध्ये १४० विहिरींचे, तर ३१५ बोअरचे अधिग्रहण केल्यामुळे पावसाळय़ातही पिण्याच्या पाण्यावर पाण्यासारखाच पसा खर्च करावा लागत आहे.

First published on: 11-07-2014 at 01:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply in 209 tanker in beed