कल्याण परिसरात पावसाची संततधार सुरू असून, सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. अंबरनाथ येथे पालिका रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यास कोंडी झाल्याने एक-ते-दीड फूट पाणी साचले आहे. तसेच या रस्त्याच्या आसपासच्या परिसरातील घरांमध्येही पाणी साचले आहे. मुसळधार पावसाचा फटका कल्याण-बदलापूर रस्त्यावरील वाहतूकीलाही बसला आहे. पाणी साचल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली आहे.
याचा मध्यरेल्वेवर सध्यातरी कोणताही परिणाम झालेला नाही. परंतु, अंबरनाथ पालिका रस्त्यावर पाणी साचल्याने पालिकेची निकृष्ट दर्जाची कामे उघड पडली आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
(संग्रहित छायाचित्र)
First published on: 18-06-2013 at 01:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain in kalyan