ठाणे शहरात कोपीनेश्वर सांस्कृतिक न्यासने दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले असून यंदाची यात्रा दुष्काळग्रस्तांसाठी निधीसंकलन, स्वामी विवेकानंदांची १५० वी जयंती आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर आधारित अशी असणार आहे.
  यंदा ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा.कृ.सोमण यात्रेच्या स्वागताध्यक्षपदी आहेत. तसेच डॉ. अश्विनी बापट निमंत्रक आणि प्रसाद दाते सहनिमंत्रक आहेत.  
यात्रेमध्ये शहराच्या विविध भागांत लावण्यात येणारे झेंडे, तसेच रांगोळी, पोस्टर, बग्गी, फटाके यांसारख्या विविध गोष्टींवर होणाऱ्या खर्चात कपात करुन शिल्लक रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी राखून ठेवली जाणर आहे. स्वामी विवेकानंदांच्या १५० जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचारांचा प्रसार यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच देशभर महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन स्त्री सन्मान, स्त्रीसुरक्षा आणि स्त्री जागृतीचा संदेश यावेळी देण्यात येणार आहे. यावर्षी अधिकाधिक महिला संस्था, महिला बचतगट, संघटना आणि भजनी मंडळांचा यात्रेत सहभाग असणार आहे.
स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला यंदाही येथील मासूंदा तलाव परिसरात पणत्या लावून आणि आकाशात दिवे सोडून दिपोत्सव साजरा केला जाणार आहे. अधिकाधिक ठाणेकरांना यात्रेत सहभागी होण्याचे कोपीनेश्वर सांस्कृतिक न्यासचे अध्यक्ष मा.य.गोखले यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Welcome rally on new year day in thane