प्रबुद्ध मस्के

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द्वेष हा राष्ट्रवादासाठी आवश्यक आहे का, असा प्रश्न उपस्थित करून गांधीजींनी जे लोक द्वेष हा राष्ट्रवादाचा आवश्यक घटक मानतात ते एका मोठ्या भ्रमात राहतात असे सांगितले. द्वेष हा मानवतावादाच्या पोषकतेस व त्याच्या वाढीस खीळ घालतो. म्हणून जात, धर्म, वंश, वर्ग, भाषा, प्रांत व लिंग यावरून द्वेष करणे किंवा पसरवणे हे मानवतेसाठी घातक ठरते. ही वृत्ती पोसणे म्हणजे व्यक्ती, कुटुंब व पर्यायाने राष्ट्राची प्रगती खुंटविणे होय. एखाद्या व्यक्ती वा समूहावर आपण प्रेम करत नाही; पण म्हणून त्या व्यक्ती वा समूहाचा द्वेष किंवा तिरस्कार करणे आवश्यक असते का? अर्थातच नाही. आपण एकमेकांवर प्रेम न करताही समाजात एकत्र राहू शकतो; पण प्रेम नसलेल्या समाजात कोणत्याही प्रकारची प्रगती उद्भवत नाही. म्हणून कोणत्याही व्यक्ती, समूह किंवा राष्ट्राच्या प्रगतीचा आधार हा प्रेमच असू शकतो द्वेष नव्हे. त्यामुळेच अनेकवेळा प्रेम (Love) हा द्वेष (Hatred) या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणून पाहिला जातो.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How nationalism will built on the foundation of hatred asj
First published on: 29-03-2023 at 11:21 IST