राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी लेखक/प्रकाशकांनी अर्ज करण्याचे तसेच पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०१२-१३ या वर्षांसाठीच्या पुरस्कारांसाठी हे अर्ज करायचे आहेत. १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीचा पुरस्कारांसाठी विचार केला जाणार आहे. पुरस्कारांसाठीची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय़ मंदिर इमारत, दुसरा मजला, प्रभादेवी, दादर (पश्चिम), मुंबई- येथे किंवा मुंबई वगळता इतर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात (सर्वसाधारण शाखा/करमणूक शाखा) येथे विनामूल्य उपलब्ध आहेत.  प्रवेशिका साहित्य व संस्कृती मंडळाच्या कार्यालयात आणि इतर जिल्ह्यातील लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये १० जून ते १० जुलै २०१३ या कालावधीत पाठवाव्यात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appeal to application for state vadmay award