केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. ज्यामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामीण भाग आदी क्षेत्रांना चालना देण्याच्या दृष्टीने भरीव तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले. जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक कालावधी हा अर्थसंकल्पाचे वाचन करण्यासाठी लागला. या अर्थसंकल्पावर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निराशाजनक आणि गोंधळात टाकणारं बजेट असं या अर्थसंकल्पाच वर्ण केले आहे. तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प येत्या संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा असल्याचे सांगत, याबद्दल पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे अभिनंदन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देता फडणवीस म्हणाले, मी अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि पंतप्रधान मोदींची अभिनंदन करतो. विकासाला चालना देणारा असा अर्थसंकल्प आज त्यांनी माडंला आहे. हा अर्थसंकल्प विशेषता येत्या संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा आहे. एकीकडे कृषी क्षेत्रासाठी प्रचंड मोठ्याप्रमाणात तरतूदी यामध्ये करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रातील आज जी काही आव्हानं आहेत, ज्या काही अडचणी आहेत. त्या सर्व विचारात घेऊन जो १६ कलमी कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. तो उत्पादकता वाढवण्यापासून ते मला वाहतूक, निर्यात, बाजारपेठांशी जोडणी करणे या प्रत्येक बाबीतील ज्या काही कमतरता आहेत, त्या भरून काढणारा असा हा कार्यक्रम आहे. यासाठी मोठ्याप्रमाणावर तरतूद देखील मोठ्याप्रमाणावर ठेवण्यात आलेली आहे.

आपल्याला जर आपला विकासदर कायम ठेवायचा असेल व रोजगार निर्मिती करायची असेल तर मोठ्याप्रमाणावर त्यासाठी पायाभूत सुविधांवर गुंतवणूक ही महत्वाची आहे. देशभरातील ६ हजार ५०० प्रकल्प शोधून तब्बल १०३ लाख कोटी म्हणजे जवळजवळ २० लाख कोटी दरवर्षींची गुतंवणुकीची जी काही योजना बनवण्यात आलेली आहे. यामधुन पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खूप मोठ्याप्रमाणात विकास होणार आहे. मग, यामध्ये १०० विमानतळं असतील, प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा, देशभरातील रस्ते व महामार्गांची कामं, रेल्वेचे विविध प्रकल्प आदी सर्व प्रकारचे प्रकल्प तयार होत आहे. कृषी व पाटबंधारे विभागातील पायाभूत सुविधा आदींचाही समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जवळपास ३ लाख ७ हजार कोटी रुपयांची पाईप पद्धतीने प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्यासंदर्भात जी काही योजना त्यामध्ये मांडण्यात आलेली आहे. याद्वारे एकूणच शेती आणि अन्य पायाभूत सुविधांमध्ये खूप मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. यामुळे विकासदराला चालना तर मिळेलच, परंतु मोठ्याप्रमाणवर रोजगार संधी देखील निर्माण होणार आहेत. शिवाय, मध्यवर्गीयांना प्राप्तिकरात दिलासा या अर्थसंकल्पाने दिलेला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budget 2020 fadnavis reaction on the budget msr