वृत्तसंस्था, नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेअतंर्गत देशात विकसित केलेल्या ५जी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रथमच ५जीची आयआयटी मद्रास येथे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून यशस्वी चाचणी घेण्यात आली. आयआयटी मद्रासने विकसित केलेले हे तंत्रज्ञाना देशातच विकसित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५जी तंत्रज्ञान हायपरलूप प्रकल्पासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. चालू वर्षांच्या अखेरीस ५जी तंत्रज्ञान प्रकल्प पूर्ण होणार असून सप्टेंबर-ऑक्टोबपर्यंत भारत स्वत:चे स्वदेशी ५जी तंत्रज्ञान तयार करेल. हेच तंत्रज्ञान एकविसाव्या शतकातील देशाच्या प्रगतीचा वेग ठरवेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, ५जीच्या माध्यमातून देशात सुमारे १.५ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successful testing indigenous 5g technology self reliant india scheme developed ysh
First published on: 21-05-2022 at 00:02 IST