चाणक्य नीतितील सूचना मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देतात. चाणक्य यांना आचार्य चाणक्य असेही संबोधलं जातं. त्यांना अर्थशास्त्र, राजकारण, मुत्सद्देगिरी आणि समाजशास्त्र इत्यादी विषयांचे सखोल ज्ञान होते. चाणक्य यांना त्यांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून असे आढळून आले की, जर माणसाला जीवनात यश मिळवायचे असेल तर गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. चाणक्याची विद्वत्ता, कौशल्य आणि दूरदृष्टी भारतातील धर्मग्रंथ, कविता आणि इतर ग्रंथांमध्ये दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकारात्मक ऊर्जा : चाणक्य नीति सांगते की कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी ऊर्जेला विशेष महत्त्व असते. माणसासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक ऊर्जा. एखाद्या व्यक्तीला जीवनात मोठे यश मिळवून देण्यासाठी सकारात्मक ऊर्जा उपयुक्त ठरते. सकारात्मक ऊर्जा माणसाला कलात्मक बनवते. सकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीची कार्यक्षमता वाढते. तसेच ध्येय सहज साध्य करतात.

Chanakya Niti: जीवनात आर्थिक संकट येण्याची पाच लक्षणं, जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

मनःशांती : चाणक्य नीतिनुसार मानसिक शांती खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करू शकत नाही. ज्या लोकांचे मन शांत असते, त्यांना जीवनात अपार यश मिळते. चाणक्य नीतिनुसार मनःशांतीसाठी उत्तम गुण अंगीकारले पाहिजेत. शिक्षण आणि ज्ञानाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. शिस्त पाळली पाहिजे तरच मनःशांती मिळू शकते. कोणत्याही प्रकारचे दोष हे मनःशांतीमध्ये अडथळा आणणात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti for peace of mind and positive energy rmt