Chanakya Niti For Life: आचार्य चाणक्य यांनी केवळ अर्थशास्त्र, राजकारण याविषयी सांगितले नाही तर दैनंदिन जीवनातील त्रास टाळण्यासाठी उपाय सांगितले आहेत. मुत्सद्देगिरीत पारंगत असलेल्या चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात शत्रूच्या डावपेचापासून कसे वाचावे आणि ते कोण आहेत ज्यांच्यापासून नेहमी दूर राहावे हे सांगितले आहे. चाणक्य नीति सांगते की प्रत्येक व्यक्तीने कधीही ३ प्रकारच्या लोकांकडून मदत मागू नये, परंतु त्यांच्यापासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर हे लोक शत्रूपेक्षाही घातक ठरतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे लोक शत्रूपेक्षा जास्त धोकादायक असतात
चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, जर एखादी व्यक्ती सर्वात मोठ्या संकटात सापडली तर त्याने कधीही ३ प्रकारच्या लोकांची मदत मागू नये. या लोकांकडून मदत मागणे म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. कारण हे लोक शत्रूपेक्षा जास्त घातक आणि नुकसान करतात.

आणखी वाचा : Chanakya Niti: या कामांसाठी पैसे खर्च करण्यास मागेपुढे पाहू नका, लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहील

स्वार्थी लोक: चाणक्य नीति म्हणते की, लोक तुमचे कधीही चांगले करणार नाहीत, परंतु समोर चांगले राहून ते तुमचे वाईटच करतील. त्यांच्या स्वार्थासाठी ते तुमचे कितीही नुकसान करतील, म्हणून त्यांच्याकडे मदत मागू नका.

ईर्ष्यावान लोक: जे इतरांचा मत्सर करतात ते कधीही कोणाचे भले करत नाहीत. त्यांनी तुमच्यासमोर तुम्हाला मदत करण्याचा कितीही आव आणला तरी ते तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतील.

आणखी वाचा : Chanakya Niti: घरात असे संकेत दिसले तर वेळीच सावध व्हा, वाईट काळ सुरू होण्याआधी संकेत देतात!

रागीट व्यक्ती : ज्या व्यक्तीचा त्यांच्या रागावर नियंत्रण नाही अशा व्यक्तीची मदत कधीही मागू नका. कारण अशी अनियंत्रित व्यक्ती तुमचा त्रास कमी होण्याऐवजी वाढवेल. अशा व्यक्तीशी मैत्री किंवा वैर करू नका.

(टीप: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti says these people are more harmful than enemy always stay from them prp