Mahakumbh 2025 GrahYog : महाकुंभमेळ्याचा उत्सव १३ जानेवारीपासून सुरू होईल तो २६ फेब्रुवारीपर्यंत असेल. २०२५ सालचा महाकुंभ खूप खास आहे, कारण महाकुंभ केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा मानला जात आहे. या मागचे कारण म्हणजे १४४ वर्षांनंतर महाकुंभमेळ्यात एक अद्भुत योग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार १४४ वर्षांनंतर, महाकुंभावर सूर्य, चंद्र, शनी आणि गुरुची शुभ स्थिती असेल. यासह पौर्णिमा, रवि योग आणि भाद्रवास योगदेखील तयार होत आहेत. ग्रहांचा हा संयोग समुद्र मंथनाच्या वेळीदेखील घडला असल्याने ते अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते.
गुरु वृषभ राशीत असतो आणि ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत असतो तेव्हा महाकुंभाचा योग जुळून येतो. या काळात गुरुची दृष्टी सूर्यावर पडते, ज्यामुळे हा काळ खूप शुभ असतो. दर १२ वर्षांनी जेव्हा गुरु १२ राशींमधून आपला प्रवास पूर्ण करतो आणि वृषभ राशीत प्रवेश करतो, तेव्हा महाकुंभ आयोजित केला जातो. पण, जेव्हा हे राशी चक्र १२ वेळा पूर्ण होते म्हणजेच १४४ वर्षांनी, तेव्हा संपूर्ण महाकुंभ होतो. अशा स्थितीत १४४ वर्षांनंतर दुर्मीळ योगामुळे काही राशींवर शुभ परिणाम होण्याची शक्यता आहे.
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार २०२५ च्या महाकुंभदरम्यान मेष राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. मोठी ध्येये साध्य करण्यात तुम्हाला यश मिळू शकेल. व्यवसायातही तुम्हाला प्रचंड प्रगती मिळू शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला फायदे मिळतील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ पूर्णपणे अनुकूल आहे. या काळात मेष राशीच्या लोकांना सर्व प्रकारचे सुख मिळेल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांनाही या काळात लाभ होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल, काम करण्याची नवी ऊर्जा मिळेल. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवू शकता. अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. करिअर आणि नोकरीत प्रगतीची दाट शक्यता असेल. नोकरी करणाऱ्यांना इच्छित स्थळी बदली किंवा पगारात वाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहतील. तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामात यश मिळू शकते.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्यवान ठरू शकतो. या काळात मकर राशीच्या लोकांवर शनी देवाची विशेष कृपा असेल, आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढू शकतो. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. नोकरी करणाऱ्यांना लाभ मिळतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. मानसिक ताणतणावापासून मुक्तता मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरी मिळू शकते.
(टीप – वरील लेख माहितीवर आधारित आहे.)
© IE Online Media Services (P) Ltd