Sun-Varun Ardhakedra Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, ठराविक वेळेनंतर होणाऱ्या ग्रहांच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनासह दोन ग्रहांची युती, राजयोग, ग्रहांची शुभ दृष्टी देखील खूप महत्वपूर्ण मानली जाते. ग्रहांचा राजा सूर्य एक महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीवर पडतो. सध्या सूर्य मेष राशीत विराजमान असून तो १५ मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. परंतु तत्पूर्वी ६ मे रोजी सूर्य, वरूण ग्रहाबरोबर अर्धकेंद्र योग निर्माण करत आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग खूप भाग्यकारक मानला जातो.

पंचांगानुसार, ६ मे २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी सूर्य-वरूण एकमेकांपासून ४५ डिग्रीवर असतील, ज्यामुळे अर्धकेंद्र योग निर्माण होईल. दरम्यान, वरूण हा सर्वात हळूवार गतीने चालणारा ग्रह आहे, जो एका राशीत तब्बल १४ वर्ष राहतो. सध्या वरूण मीन राशीत विराजमान आहे.

सूर्य-वरूण ‘या’ तीन राशींचे नशीब बदलणार

वृषभ (Vrushabh Rashi)

सूर्य-वरूणाचा अर्धकेंद्र योग वृषभ राशीसाठी भाग्यदायी सिद्ध होईल. तुमच्या आयुष्यात नवे बदल होतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही हा योग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल.

कर्क (Kark Rashi)

अर्धकेंद्र योग कर्क राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)