Success Story: कल्याणी आणि दिनेश या इंजिनिअर जोडप्याने बाजरीचे उत्पादन घरोघरी परत आणण्याचे काम केले. २०१० मध्ये या जोडप्याने अर्थ ३६० नावाच्या उपक्रमाची पायाभरणी केली. ते रेडी-टू-कुक आणि रेडी-टू-ईट प्रोडक्‍ट्स उत्पादनांसह बाजरी लोकप्रिय करत आहेत. या उपक्रमाने दक्षिण भारतात बाजरीआधारित ५० उद्योग स्थापन केले आहेत आणि १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना बाजरी लागवड करण्यास मदत केली आहे. अर्थ ३६०ने गेल्या आर्थिक वर्षात २.०५ कोटी रुपयांची उलाढाल केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याणी आणि दिनेश आंध्र प्रदेशातील अनंतपूरपासून ९२ किमी अंतरावर असलेल्या कादिरी येथे राहतात. कल्याणीचे पती दिनेश यांनी २०१० मध्ये अर्थ ३६० इको व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. त्यांनी बाजरीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, एंटरप्राइझने तंत्रज्ञान विकास, उत्पादन, खरेदी, प्रक्रिया तसेच बाजरी आणि बाजरी उत्पादनांच्या विपणनाद्वारे बाजरीआधारित पुरवठा साखळी तयार केली.

कल्याणी आणि दिनेश यांच्या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना बाजरीची लागवड करण्यास मदत करणे, बाजरीवर प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे, बाजरीवर आधारित पदार्थांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि बाजरीचे पीठ, डाळ, रवा आणि इतर खाद्यपदार्थ विकणे हे आहे. ते बाजरी अनेक प्रकारे विकतात. काही बाजरीवर आधारित उत्पादने बाजारात आणली जातात. फॉक्सटेल ‘पोंगल’ (खिचडी) आणि ‘बिसी बेले भात’ मिक्स, पॉप्ड ज्वारी आणि मल्टी बाजरी मिक्स (न्यूट्री मिक्स, रोटी मिक्स, डोसा मिक्स आणि खिचडी मिक्स) हे प्रमुख आहेत.

हेही वाचा: Success Story : भाड्याच्या घरातून सुरू केलं काम अन् उभारली तब्बल ८,४०० कोटींची संपत्ती

कल्याणी-दिनेश यांचे शिक्षण

कल्याणीने आंध्र प्रदेशातील पॉलिटेक्निकमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला असून दिनेशने म्हैसूरमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीईचे शिक्षण घेतले आहे. ते तिंबक्तू कलेक्टिव्ह नावाच्या संस्थेत भेटले, जिथे दोघे काम करत होते. हल्लीच्या काळात लोक गहू, तांदळाचे दररोजच्या आहारात भरपूर सेवन करतात, ज्यामुळे हळूहळू बाजरीसारख्या धान्याचे उत्पन्न कमी होऊ लागले आहे. हे उत्पन्न अधिक वाढवण्यासाठी हे जोडपे कार्य करत आहे.

कल्याणी आणि दिनेश आंध्र प्रदेशातील अनंतपूरपासून ९२ किमी अंतरावर असलेल्या कादिरी येथे राहतात. कल्याणीचे पती दिनेश यांनी २०१० मध्ये अर्थ ३६० इको व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. त्यांनी बाजरीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, एंटरप्राइझने तंत्रज्ञान विकास, उत्पादन, खरेदी, प्रक्रिया तसेच बाजरी आणि बाजरी उत्पादनांच्या विपणनाद्वारे बाजरीआधारित पुरवठा साखळी तयार केली.

कल्याणी आणि दिनेश यांच्या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना बाजरीची लागवड करण्यास मदत करणे, बाजरीवर प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे, बाजरीवर आधारित पदार्थांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि बाजरीचे पीठ, डाळ, रवा आणि इतर खाद्यपदार्थ विकणे हे आहे. ते बाजरी अनेक प्रकारे विकतात. काही बाजरीवर आधारित उत्पादने बाजारात आणली जातात. फॉक्सटेल ‘पोंगल’ (खिचडी) आणि ‘बिसी बेले भात’ मिक्स, पॉप्ड ज्वारी आणि मल्टी बाजरी मिक्स (न्यूट्री मिक्स, रोटी मिक्स, डोसा मिक्स आणि खिचडी मिक्स) हे प्रमुख आहेत.

हेही वाचा: Success Story : भाड्याच्या घरातून सुरू केलं काम अन् उभारली तब्बल ८,४०० कोटींची संपत्ती

कल्याणी-दिनेश यांचे शिक्षण

कल्याणीने आंध्र प्रदेशातील पॉलिटेक्निकमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला असून दिनेशने म्हैसूरमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीईचे शिक्षण घेतले आहे. ते तिंबक्तू कलेक्टिव्ह नावाच्या संस्थेत भेटले, जिथे दोघे काम करत होते. हल्लीच्या काळात लोक गहू, तांदळाचे दररोजच्या आहारात भरपूर सेवन करतात, ज्यामुळे हळूहळू बाजरीसारख्या धान्याचे उत्पन्न कमी होऊ लागले आहे. हे उत्पन्न अधिक वाढवण्यासाठी हे जोडपे कार्य करत आहे.