Karnatak Crime : कर्नाटकातील रायचूर येथील एका आश्रमात पेन चोरल्याचा आरोप करत इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. लाकडाने मारहाण करून त्याला तीन दिवस खोलीत डांबून ठेवले, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी रविवारी केला. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रायचूर येथील रामकृष्ण आश्रमात राहणाऱ्या तरुण कुमार या मुलाला प्रभारी वेणुगोपाल आणि त्याच्या साथीदारांनी खूप मारहाण केली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“दोन मोठी मुले आणि एका शिक्षकाने मला मारले. त्यांनी माझ्यावर लाकडाचा मारा केला आणि ते तुटल्यावर त्यांनी बॅटचा वापर केला. त्यांनी माझ्या अंगावरही जखमा केल्या. त्यांनी मला रेल्वे स्टेशनवर भिक्षा मागण्यासाठी यागदीर येथे नेले, पण मला पैसे मिळाले नाहीत”, असं त्या मुलाने सांगितलं.

मुलाला अनेक जखमा

या हल्ल्यात मुलाला अनेक जखमा झाल्या आणि त्याचे डोळे पूर्णपणे सुजले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुलाच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे तो आश्रमातच राहत होता. खेळत असताना, त्याच्या वर्गमित्रांनी त्याच्यावर पेन चोरल्याचा आरोप केला आणि घटनेची माहिती आश्रम अधिकाऱ्यांना दिली, ज्यांनी मुलाला निर्दयीपणे मारहाण केली. तरुणाच्या आईने रामकृष्ण आश्रमाला भेट दिली तेव्हा ही घटना उघडकीस आली.

हेही वाचा >> बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार! ९१ जणांचा मृत्यू; सरकारकडून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू!

माझ्या मुलाने पेन चोरला नाही

“माझ्या मुलाचे नाव तरुण कुमार आहे. तो तिसऱ्या वर्गात आहे. माझा दुसरा मुलगा अरुण कुमार पाचव्या इयत्तेत आहे. मी दोघांना आश्रमात सोडले. जेव्हा मी त्यांना भेटायला गेले तेव्हा माझा मोठा मुलगा अरुण याने मला तरुणवर हल्ला कसा झाला आणि त्याच्या चेहऱ्याला कसे जखमा झाल्या याची माहिती दिली”, असं पीडित मुलाची आई म्हणाली. आपल्या मुलाने पेन चोरल्याचा आरोप आईने फेटाळून लावला, “त्याने खाली पडलेले पेन उचलले आणि दुसरीकडे ठेवले.”

“दुसऱ्या मुलाने शनिवारी माझ्या मुलाला शिक्षकाचे पेन दिले कारण त्याच्याकडे ते नव्हते. रविवारी पेन शोधत असताना शिक्षकांना ते माझ्या मुलाकडे सापडले आणि ही संपूर्ण घटना एका पेनवरून घडली,” ती म्हणाली. “पेन चोरल्याबद्दल” अशी वागणूक न दिल्यास मूल भविष्यात चोर होईल, असा आरोपही आईने केला आहे.

“शिक्षकाने माझ्या मुलाचा इतका वाईट छळ केला की लोक म्हणतात माझ्या मुलाचा पुनर्जन्म झाला आहे. शिक्षकाने माझ्या मुलाला दोन बेल्टने मारले, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याचे हात बांधले. शिक्षकाने त्याचे पाय आणि हात धरले आणि त्याला मध्यरात्रीपर्यंत मारहाण केली,” आईने आरोप केला.

बाल हक्क कार्यकर्ते सुदर्शन यांनी सांगितले की, मुलाची सुटका करण्यात आली आहे आणि हे प्रकरण महिला व बालकल्याण मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnatak crime class three student beaten up for pen theft in raichur ashram sgk