“भारत पाकव्याप्त काश्मीर (पीओके) कधीही सोडणार नाही, परंतु जबरदस्तीने ते ताब्यातही घेणार नाही. काश्मीरचा विकास पाहून पीओकेचे नागरिक स्वतः भारतात सामील होतील”, असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला वाटते की भारताला काहीही करावे लागणार नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये ज्या प्रकारे ग्राउंड परिस्थिती बदलली आहे, ज्या प्रकारे या प्रदेशात आर्थिक प्रगती होत आहे आणि ज्या प्रकारे तेथे शांतता परत आली आहे, मला वाटते की पीओकेच्या लोकांकडूनच भारतात विलीन होण्याच्या मागण्या पुढे येतील”, असं ते म्हणाले. “पीओके घेण्यासाठी आम्हाला बळाचा वापर करावा लागणार नाही कारण लोक म्हणतील की आम्हाला भारतात विलीन केले पाहिजे. अशा मागण्या आता येत आहेत. पीओके आमचा होता, आहे आणि राहील”, असे प्रतिपादन संरक्षणमंत्र्यांनी केले.

आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्टची गरज नाही

कलम ३७० रद्द केल्यापासून काश्मीरमधील सुधारलेल्या परिस्थितीचा संरक्षणमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. राजनाथ सिंह म्हणाले की, लवकरच केंद्रशासित प्रदेशात AFSPA (आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट) ची गरज भासणार नाही.

हेही वाचा >> नुपूर शर्मासह तिघांना धमक्या, सनातन संघटनेच्या अध्यक्षाच्या हत्येचा कट; मुस्लीम धर्मगुरूला सुरतमधून अटक!

इस्लामाबादने सीमेपलिकडचा दहशतवाद थांबवला पाहिजे

“जम्मू आणि काश्मीरमध्ये ज्या प्रकारे परिस्थिती सुधारत आहे, मला वाटते की एक वेळ येईल जेव्हा तेथे AFSPA ची आवश्यकता राहणार नाही. हे माझे मत आहे आणि ते गृह मंत्रालयाने ठरवायचे आहे”, असंही ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या प्रॉक्सी युद्धाचा संदर्भ देत संरक्षण मंत्री म्हणाले की इस्लामाबादने सीमेपलीकडील दहशतवाद थांबवला पाहिजे. ते भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्ही ते होऊ देणार नाही.

हेही वाचा >> Poonch Terror Attack : भारतीय वायुसेनेच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्याचा राहुल गांधींकडून निषेध; म्हणाले “हा भ्याड हल्ला…”

पूर्व लडाख सीमेवरील रांगेवर सिंग म्हणाले, “चीनशी चर्चा सुरू आहे; देशाच्या सीमा सुरक्षित राहतील. भारत सीमावर्ती भागात जलद गतीने पायाभूत सुविधांचा विकास करत आहे.”

नवा भारत सज्ज आहे

“पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहिल”, अशा तीव्र शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कायमच दम दिला आहे. त्यांनी सातत्याने पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. “देशावर वाईट नजर टाकणाऱ्यांना त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी एक मजबूत आणि आत्मविश्वासाने भरलेला नवा भारत सज्ज आहे”, असा इशाराही त्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No need to capture pok its people will themselves want to join india says rajnath singh sgk