कोणीही आमच्या देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना जशास तसं प्रत्युत्तर देऊ, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, भारतावर कोणी वाईट नजर टाकल्यास, भारतीय सेना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुसज्ज, सक्षम आणि तयार आहेत.
संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी अदिती योजना तयार करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री म्हणाले की, स्वातंत्र्याच्या काळापासून भारतीय नौदलाने स्वावलंबनाला प्राधान्य दिले आहे.
भारताने शुक्रवारी ओदिशाच्या चांदीपूर सागरकिनारी भागात असलेल्या एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) वरून नव्या अद्ययावत ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची (आकाश न्यू जनरेशन) यशस्वी चाचणी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.