अफगाणिस्तानवर तीन गडी राखून मिळवलेला रोमहर्षक विजय हा सांघिक कामगिरीमुळे शक्य होऊ शकला, असे मत पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने व्यक्त केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
‘‘हा विजय आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण होते. पण इमाद वासिमने ज्या प्रकारे दडपणाचा सामना करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला, याचे संपूर्ण श्रेय त्यालाच जाते. अफगाणिस्तानचे गोलंदाजही खेळपट्टीचा फायदा उठवतील, त्यामुळे धावांचा पाठलाग करणे सोपे नसेल, याची आम्हाला कल्पना होती. बाबर आझम आणि इमाद यांनी अप्रतिम फलंदाजी केली,’’ असे सर्फराजने सांगितले.
‘‘डावाच्या मधल्या टप्प्यात मोठय़ा भागीदारीची अपेक्षा होती. तसे न घडल्यामुळेच सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणे कठीण असले तरी आम्ही एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहोत,’’ असे सर्फराजने सांगितले.
First published on: 01-07-2019 at 01:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarfaraz ahmed icc cricket world cup