शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणी पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी अटक केली. ईडीने अटकेची कारवाई केल्यानंतर पार्थ चॅटर्जी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चार वेळा फोन लावला. पण एकदाही फोन उचलण्यात आला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकियेप्रमाणे, जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते, तेव्हा ती व्यक्ती आपला कुटुंबीय, नातेवाईक किंवा मित्र यांच्यापैकी एका व्यक्तीला फोन करुन माहिती देऊ शकतं. ईडी अटकेची कारवाई करत असताना पार्थ चॅटर्जी यांनी आपल्याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना फोन करुन अटकेची माहिती द्यायचं असल्याचं सांगितलं.

पश्चिम बंगालच्या मंत्र्याला दोन दिवसांची ‘ईडी’ कोठडी; शिक्षक भरती गैरव्यवहाराची चौकशी

यानंतर पार्थ चॅटर्जी यांनी मध्यरात्री २.३१,२.३३, ३.३७ आणि सकाळी ९.३५ ला असे चार फोन केले. पण एकदाही समोरुन उत्तर आलं नाही.

पार्थ चॅटर्जींना अटक कशासाठी?

शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणात पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची ईडी कोठडी सुनावली. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या चॅटर्जी यांना अटकेनंतर बंकशाल न्यायालयात हजर करण्यात आलं. शनिवारी ईडीचे विशेष न्यायालय बंद असल्याने त्यांना या न्यायालयात हजर करण्यात आलं. अटकेपूर्वी चॅटर्जी यांची त्यांच्या निवासस्थानी सुमारे २६ तास चौकशी करण्यात आली.

पश्चिम बंगाल शालेय सेवा आयोगाच्या शिफारशींनुसार झालेली गट क आणि ड कर्मचाऱ्यांची भरती तसेच शासन प्रायोजित, अनुदानित शाळांत झालेल्या शिक्षकांच्या भरतीची चौकशी कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करीत आहे. या गैरव्यवहारातील पैशांच्या व्यवहारांचा मागोवा ईडीकडून घेतला जात आहे. ईडीने शुक्रवारी यासंबंधात सुमारे बारा जणांच्या घरांवर छापे टाकले. यात दोन मंत्र्यांचा समावेश आहे. या छाप्यांत सुमारे २० कोटी रुपयांची रोख जप्त करण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc ledaer partha chatterjee called mamata banerjee four times during arrest sgy