लोकसभेतून कॉंग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर भाजपचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ज्या पद्धतीने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी २५ खासदारांना सभागृहातून निलंबित केले, त्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली.


गेल्याच महिन्यात शत्रुघ्न सिन्हा यांनी नितीशकुमारांची भेट घेतल्यावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. ते भाजपला सोडचिठ्ठी देणार, अशीही शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी ही शक्यता फेटाळून लावली होती.