पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बनावट शाळा (डमी स्कूल) या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही आणि त्याबाबत गंभीर चर्चा करण्याची वेळ आली आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी रविवारी सांगितले.

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत प्रधान म्हणाले, डमी शाळेच्या मुद्दय़ावर अनेक तज्ज्ञांनी मतप्रदर्शन केलेले आहे. ‘डमी स्कूल’ या सामान्य शाळेसारख्याच शाळा असतात. मात्र या शाळेत जाण्याची गरज नसते. या शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी भरमसाट शूल्क आकारले जाते. मात्र शाळांमध्ये प्रवेश केवळ नावालाच होतो. अशा प्रकारे शाळेत न जाणे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक वाढीस अडथळा आणते आणि त्यांना अनेकदा एकटेपणा आणि मानसिक तणाव जाणवतो. त्यामुळे या मुद्दय़ावर चर्चा करण्याची गरज असल्याचे मत प्रधान यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>>अफगाणिस्तानात तीव्र भूकंप; मृतांचा आकडा २०५३ वर, ९ हजाराहून अधिक जखमी

‘१०वी, १२वी परीक्षा दोनदा देणे बंधनकारक नाही’

विद्यार्थ्यांना वर्षांतून दोनदा १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला बसणे बंधनकारक असणार नाही आणि एकाच संधीच्या भीतीने निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी हा पर्याय आणला जात आहे, असे प्रधान यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईईप्रमाणेच वर्षांतून दोनदा (१०वी व १२वी) परीक्षेला बसण्याचा पर्याय असेल. ते सर्वोत्तम गुण निवडू शकतात. परंतु ते पूर्णपणे वैकल्पिक असेल, कोणतीही सक्ती नाही.

एक वर्ष गमावले, त्यांची संधी गेली किंवा अधिक चांगली कामगिरी करता आली असती या विचाराने विद्यार्थी अनेकदा तणावग्रस्त होतात. एकाच संधीच्या भीतीमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी हा पर्याय आणला जात आहे,’’ असे प्रधान म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union education minister dhamendra pradhan is of the opinion that a serious discussion is needed on the issue of fake schools amy