निरोगी राहण्यासाठी वेगवेगळी भाज्या, फळं यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. भाज्या, फळं यांमध्ये शरीराला आवश्यक पोषकतत्त्व आढळतात. ऋतुनुसार उपलब्ध होणाऱ्या पदार्थांचा आपण जेवणात समावेश करतो. पण कोणत्याही हवामानात काही भाज्या, फळं कापली की त्यांचा रंग गडद होत जातो, त्यांचा रंग तपकिरी काळसर होत असल्याचे तुम्हाला जाणवले असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बटाटे, सफरचंद, वांगी यांना कापल्यानंतर त्यांचा रंग तपकिरी किंवा कालसर होऊ लागतो. पण यामागचे कारण अनेकांना माहित नसते. यामागे काय वैज्ञानिक कारण आहे जाणून घ्या.

आणखी वाचा: गुडघ्यावर बसून का केलं जात प्रपोज? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

फळं, भाज्या कापल्यानंतर काळी पडण्याचे वैज्ञानिक कारण

बटाटे, सफरचंद, वांगी अशी फळं, भाज्या कापल्यानंतर काळी पडण्यामागे एक वैज्ञानिक क्रिया जबाबदार आहे. ज्याचे नाव इंनझिमॅटिक ब्राउनिंग (Enzymatic Browning) आहे. ज्यामध्ये फळं किंवा भाज्या हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्यांमध्ये एक रासायनिक बदल घडून येतो, ज्यामुळे त्यांचा रंग गडद तपकिरी किंवा काळा दिसू लागतो.

आणखी वाचा: रेल्वे प्लॅटफॉर्मवर का असते ही पिवळी पट्टी? जाणून घ्या यामागचे महत्त्वपूर्ण कारण

इंनझिमॅटिक ब्राउनिंग म्हणजे काय?
इंनझिमॅटिक ब्राउनिंग ऑक्सीकरणाची प्रतिक्रिया आहे. हवेत ऑक्सिजन असते आणि फळांमध्ये फिनोल व इंजाइम फिनोलस असते. जेव्हा हे हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येते तेव्हा त्यामध्ये रासायनिक बदल घडून येतो. ज्यामुळे फिनोलेज फिनोलला मेलेनिनमध्ये बदलते. यामुळेच फळं किंवा भाज्यांचा रंग बदलून तपकिरी किंवा काळा होतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do potato apples turn brown after cutting know the scientific reason behind it pns