Premium

विश्लेषण : कापसाचे अर्थकारण यंदा डळमळीत का झाले?

यंदा सुरुवातीला ८ ते ८ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला, पण सध्या ६ ते ७ हजार रुपयांवर दर स्थिरावले आहेत. देशात यंदा कापसाच्या उत्पादनात घट दिसून आली.

sharp fall in cotton prices
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षीपेक्षा यंदा कापसाला कमी भाव मिळत असल्याने कपाशीची शेती तोटय़ात गेली आहे. उत्पादकतेपासून ते दर, विक्री आणि प्रक्रिया अशा सर्वच पातळय़ांवर कापसाचे अर्थकारण डळमळीत झाले आहे. महाराष्ट्र कापसाच्या उत्पादकतेत मागे आहे. राज्यात प्रतिएकरी जेमतेम चार क्विंटल कापसाचे उत्पादन मिळते. त्यात अतिवृष्टी-अवकाळी पावसाने कापसाच्या उत्पादकतेत घट होते. २०२१-२२ मध्ये कापसाला १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, यंदा सुरुवातीला ८ ते ८ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला, पण सध्या ६ ते ७ हजार रुपयांवर दर स्थिरावले आहेत. देशात यंदा कापसाच्या उत्पादनात घट दिसून आली. २९८ लाख गाठी कापूस उत्पादन झाल्याचे ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’ने (सीएआय) म्हटले आहे. या अंदाजानुसार कापूस बाजाराला आधार मिळायला हवा. पण तसे दिसून आले नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 02:13 IST
Next Story
युक्रेनमधील धरणाची भिंत फुटल्याने अणुऊर्जा प्रकल्पाला धोका? जाणून घ्या नेमके काय घडले?